बीड: बीड जिल्हा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल ११ वसतिगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे १५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली.
ऊसतोड हंगामादरम्यान हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते किंवा शिक्षणात सातत्य राहत नाही. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेली वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ११ वसतिगृहांमुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची सोय उपलब्ध होणार आहे. शिक्षणात सातत्य राहावे, गळती थांबावी आणि मुलांचे भविष्य घडावे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा निधी उपलब्ध झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे ऊसतोड कामगार कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण असून सामाजिक क्षेत्रातूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…