महाराष्ट्र

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीडमध्ये ११ वसतिगृहे; १५९ कोटींच्या निधीला मंजुरी; सुनेत्रा पवार

बीड: बीड जिल्हा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल ११ वसतिगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे १५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली.

ऊसतोड हंगामादरम्यान हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते किंवा शिक्षणात सातत्य राहत नाही. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेली वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ११ वसतिगृहांमुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची सोय उपलब्ध होणार आहे. शिक्षणात सातत्य राहावे, गळती थांबावी आणि मुलांचे भविष्य घडावे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा निधी उपलब्ध झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे ऊसतोड कामगार कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण असून सामाजिक क्षेत्रातूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago