बीड: बीड जिल्हा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल ११ वसतिगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे १५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली.
ऊसतोड हंगामादरम्यान हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते किंवा शिक्षणात सातत्य राहत नाही. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेली वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ११ वसतिगृहांमुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची सोय उपलब्ध होणार आहे. शिक्षणात सातत्य राहावे, गळती थांबावी आणि मुलांचे भविष्य घडावे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा निधी उपलब्ध झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे ऊसतोड कामगार कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण असून सामाजिक क्षेत्रातूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…