महाराष्ट्र

घरकुलसाठी आता मिळणार ५०,००० रुपये जास्तीचे अनुदान, एकूण अनुदान २.०९ लाख रुपयांवर

औरंगाबाद: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.

आता कोणकोणते लाभ मिळणार

PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000 मनरेगामधून 90 दिवसांची मजुरी – ₹27,000

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी – ₹12,000

नवीन वाढीव अनुदान (राज्य शासनाकडून) – ₹50,000

एकूण मिळणारे अनुदान – ₹2,09,000

हा निर्णय का घेण्यात आला 

सध्या घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य महाग झाले आहे, वाळूची टंचाई जाणवत आहे, आणि अनुदान अपुरे पडत होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली होती. आता सरकारने हे लक्षात घेऊन ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर केले आहे.

कोण लाभ घेऊ शकतो

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी

राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थी

अपूर्ण घरकुल बांधणारे लाभार्थी

नवीन पात्र अर्जदार

सौर ऊर्जा यंत्रणेचा समावेश

घरकुलांवर हरित व स्वच्छ वीजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढीव अनुदानातील ₹15,000 हे सौर यंत्रणा उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.

वाळूचा प्रश्न कधी सुटणार

घरकुलासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण अद्याप सुधारित धोरण स्पष्ट नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव रखडलेले आहेत. शासनाने कारवाईत जप्त केलेली व लिलावातील वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचे नियोजन केले आहे.

घाई करा, अंतिम मुदत जवळ आली आहे

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत १० एप्रिल २०२५ पर्यंत १.६० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तुमचेही घर यामध्ये असावे, यासाठी त्वरित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

9 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

15 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

15 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

15 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

15 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago