औरंगाबाद: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.
आता कोणकोणते लाभ मिळणार
PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000 मनरेगामधून 90 दिवसांची मजुरी – ₹27,000
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी – ₹12,000
नवीन वाढीव अनुदान (राज्य शासनाकडून) – ₹50,000
एकूण मिळणारे अनुदान – ₹2,09,000
हा निर्णय का घेण्यात आला
सध्या घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य महाग झाले आहे, वाळूची टंचाई जाणवत आहे, आणि अनुदान अपुरे पडत होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली होती. आता सरकारने हे लक्षात घेऊन ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर केले आहे.
कोण लाभ घेऊ शकतो
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी
राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थी
अपूर्ण घरकुल बांधणारे लाभार्थी
नवीन पात्र अर्जदार
सौर ऊर्जा यंत्रणेचा समावेश
घरकुलांवर हरित व स्वच्छ वीजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढीव अनुदानातील ₹15,000 हे सौर यंत्रणा उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.
वाळूचा प्रश्न कधी सुटणार
घरकुलासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण अद्याप सुधारित धोरण स्पष्ट नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव रखडलेले आहेत. शासनाने कारवाईत जप्त केलेली व लिलावातील वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचे नियोजन केले आहे.
घाई करा, अंतिम मुदत जवळ आली आहे
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत १० एप्रिल २०२५ पर्यंत १.६० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तुमचेही घर यामध्ये असावे, यासाठी त्वरित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधा.