मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २७३ विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झाला आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमधील ३६४, तर अनुदानित आश्रमशाळांमधील २०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजारांसह अपघात, आत्महत्या आणि सर्पदंशाचाही समावेश आहे.
गंभीर आजारामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सरकारी आश्रमशाळांतील १८२, तर अनुदानित आश्रमशाळांतील ९१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानंतर अपघाती मृत्यूचे प्रमाण असून, सरकारी आश्रमशाळांमधील १५५, तर अनुदानित आश्रमशाळांमधील ७३ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. आता दोन वर्षांतील ५८४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची आकडेवारी समोर आल्याने आश्रमशाळांमधील आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, सरकारी आश्रमशाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण अनुदानित आश्रमशाळांच्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा, सुरक्षित निवास व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ…
पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणांसह ऑनलाईन किराणा वितरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…
मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…
रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…
नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…
नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…