महाराष्ट्र

१ कोटीच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या निरपराध शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले असून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली.

असा घडला थरार

शनिवारी तुकाराम गव्हाणे मका विक्रीचे पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते.

रात्री सुमारे ८ वाजता घरी परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले.

मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवरून मुलाला फोन आला.

“वडिलांचे अपहरण केले आहे, १ कोटी रुपये तयार ठेवा” अशी धमकी देण्यात आली.

घाबरलेल्या मुलाने तत्काळ अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची धावपळ, पण दुर्दैव…

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कोंबिंग ऑपरेशन सुरू केले.

रविवारी दिवसभर आणि रात्रभर विविध पथके शोधासाठी रवाना करण्यात आली.

मुलाने खंडणी देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नराधमांनी तुकाराम गव्हाणे यांची हत्या केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून देण्यात आला.

ताब्यात घेतलेले पाच आरोपी कुठल्या भागातील?

गोळेगाव येथील २ आरोपी

पालोदवाडी येथील २ आरोपी

पानवडोद येथील १ आरोपी

सर्व आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती

ही घटना केवळ एका कुटुंबावर नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजावर झालेला घाला आहेmदोषींना कठोर शिक्षा मिळावी, हीच सर्वांची मागणी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

19 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

19 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

19 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

19 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

21 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

21 तास ago