महाराष्ट्र

पुण्यात मगरपट्टा चौक परिसरात गुंडांच्या टोळीची धुडगूस, नागरिकांमध्ये दहशत

पुणे: शनिवारी रात्री मगरपट्टा चौक परिसरात सुमारे ७ ते ८ जणांच्या गुंड टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर परिसरातील काही दुकानांची तोडफोड देखील केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांची पळापळ झाली, तर अनेकांनी आपल्या जीवाची धास्ती अनुभवली.

हुल्लडबाजीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मगरपट्टा सिटी हा पुण्यातील महत्त्वाचा IT हब मानला जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीती पसरली आहे.

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन आरोपींची शोधाशोध सुरू केली आहे. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू असून, नागरिकांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस Patrol वाढवण्याची मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

14 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

20 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago