मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.
निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही मतदानासाठी पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश खासगी कंपन्या, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स व रिटेल आस्थापना यांना लागू राहणार आहेत.
दरम्यान, धोकादायक किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर राहणार आहे.
या निवडणुकीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या 12 जिल्ह्यांतील संबंधित पंचायत समित्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला हक्क बजावण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…