महाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.

निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही मतदानासाठी पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश खासगी कंपन्या, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स व रिटेल आस्थापना यांना लागू राहणार आहेत.

दरम्यान, धोकादायक किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर राहणार आहे.

या निवडणुकीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या 12 जिल्ह्यांतील संबंधित पंचायत समित्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला हक्क बजावण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

56 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

14 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

20 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

20 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

20 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

21 तास ago