गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन आणि रोजगाराच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. उद्योगांचे गाजर दाखवून नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीची लूट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा अपुरी असून डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. चामोर्शी येथे नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ही आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाचे गंभीर उदाहरण आहे. मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अशी अवस्था कायम राहणे दुर्दैवी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खराब आहे, शाळा बंद पडत आहेत आणि सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांच्या घोषणा कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आधी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उभ्या करा. त्यानंतर उद्योग आणण्याचे नियोजन करा,” अशी मागणी त्यांनी केली.
आदिवासी आश्रमशाळांमध्ये मागील दोन वर्षांत सर्पदंशामुळे २८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल केला. आदिवासी विभागाच्या मंजूर निधीपैकी मागील वर्षी केवळ २९ टक्के निधी खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
“एकीकडे आश्रमशाळा आणि सिंचनासाठी निधी नाही, तर दुसरीकडे अदानी समूहाला हजारो हेक्टर जमीन देण्याची सरकारला घाई का?” असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
गडचिरोलीच्या विकासाला आपला विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली जिल्ह्याची नैसर्गिक संपत्ती लुटणे आणि स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गडचिरोलीला विकास, स्थानिकांना रोजगार आणि जिल्ह्याच्या संपत्तीवर स्थानिकांचा हक्क हवा; सत्ताधाऱ्यांची लूट नको, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार रामदास मसराम, ॲड. राम मेश्राम, अजय कंकड्यालवार, मनोहर पोरेटी, पंकज गुडेवार, सतीश विधाते, गावडे आदी उपस्थित होते.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती…
खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…
बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद,…
मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…
मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…
पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय…