जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.
टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारात अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट शिर्डी साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आले आहे. वाहन उद्योगात नवीन मॉडेलच्या यशस्वी प्रवासासाठी पहिले वाहन देवाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार टाटा मोटर्सच्या पुणे विभागातील सर्व डिलर्सनी एकत्र येत २५ लाख ७० हजार रुपये किंमतीची अत्याधुनिक टाटा सिएरा कार संस्थानला प्रदान केली.
शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या परिसरात हा हस्तांतरण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आणि टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील विविध डिलर्सच्या उपस्थितीत वाहनाचे विधीवत शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. मंत्रोच्चारांच्या घोषात गाडीला हार घालून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पूजेनंतर डिलर्सच्या वतीने गाडीची चावी अधिकृतपणे संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्सच्या सर्व डिलर्सचा शाल, श्रीफळ व साईबाबांची मूर्ती देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना गाडीलकर म्हणाले की, “टाटा मोटर्सने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही नवीन कार संस्थानच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी, पाहुण्यांच्या सुविधेसाठी तसेच सेवाभावी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”
दरम्यान, टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “साईबाबांच्या आशीर्वादाने आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात व्हावी, या श्रद्धेने आम्ही हे वाहन साईचरणी अर्पण केले आहे.”टाटा मोटर्सच्या या उपक्रमाचे भाविकांसह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…