महाराष्ट्र

साईचरणी टाटा सिएरा अर्पण; टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डिलर्सकडून शिर्डी संस्थानला 25.70 लाखांची कार भेट

जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारात अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट शिर्डी साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आले आहे. वाहन उद्योगात नवीन मॉडेलच्या यशस्वी प्रवासासाठी पहिले वाहन देवाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार टाटा मोटर्सच्या पुणे विभागातील सर्व डिलर्सनी एकत्र येत २५ लाख ७० हजार रुपये किंमतीची अत्याधुनिक टाटा सिएरा कार संस्थानला प्रदान केली.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या परिसरात हा हस्तांतरण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आणि टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील विविध डिलर्सच्या उपस्थितीत वाहनाचे विधीवत शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. मंत्रोच्चारांच्या घोषात गाडीला हार घालून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पूजेनंतर डिलर्सच्या वतीने गाडीची चावी अधिकृतपणे संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.

या प्रसंगी संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्सच्या सर्व डिलर्सचा शाल, श्रीफळ व साईबाबांची मूर्ती देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना गाडीलकर म्हणाले की, “टाटा मोटर्सने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही नवीन कार संस्थानच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी, पाहुण्यांच्या सुविधेसाठी तसेच सेवाभावी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”

दरम्यान, टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “साईबाबांच्या आशीर्वादाने आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात व्हावी, या श्रद्धेने आम्ही हे वाहन साईचरणी अर्पण केले आहे.”टाटा मोटर्सच्या या उपक्रमाचे भाविकांसह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

8 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

8 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

8 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

9 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

9 तास ago