महाराष्ट्र

दिवाळीत फटाके फोडण्यावरुन टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण…!

औरंगाबाद: औरंगाबादच्या मुकंदवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दिवाळीत फटाके वाजवण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणांनी संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलाला बेदम मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकंदवाडी भागातील काही तरुणांचा आणि संजयनगरमध्ये राहणाऱ्या मुलाचा फटाके वाजवण्यावरून वाद झाला होता. वाद एवढा विकोपाला गेला की, आठ ते दहा जणांच्या टोळक्याने या एकट्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. तर मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात मुकंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मारहाणप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

फटाके फोडताना 16 जणांना इजा

औरंगाबाद जिल्ह्यात कालपासून वेगवेगळ्या घटनेत फटाके फोडताना 16 जणांना इजा झाली आहे. तर 6 रुग्णांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ज्यात एका शहरातील मिसरवाडी भागातील 10 वर्षाच्या मुलाच्या चेहरा आणि डोळ्याला फटाके फोडताना इजा झाली आहे. त्याच्यावरही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

2 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

4 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

4 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

5 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

15 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

16 तास ago