महाराष्ट्र

दहावी-बारावी व CET निकाल लागूनही अद्याप प्रवेश सुरू नाही

राज्य शासनाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त इशारा

मुंबई: राज्यातील दहावी व बारावीचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक CET परीक्षांचे निकालही महिन्याभरापूर्वी जाहीर झाले आहेत. तरीदेखील, अकरावी, तंत्रनिकेतन पदविका, पॉलिटेक्निक, ITI व 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा पूर्ण झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे.

राज्यात सध्या 13 लाख विद्यार्थी प्रवेशासाठी वाट पाहत आहेत. CET सेलने मार्च–एप्रिल महिन्यात तब्बल 18 हून अधिक प्रवेश परीक्षा पार पाडल्या. त्यांचे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच लागले. मात्र अजूनही त्या निकालांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी करण्यात आलेला नाही.

दहावी परीक्षेत यंदा 15 लाख 33 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, परंतु अकरावी प्रवेशासाठी फक्त 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना आता फक्त पहिली फेरी संपल्यानंतर अर्ज करण्याची परवानगी आहे.त्यामुळे या लाखो विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक महिना वाया गेला असून त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे फक्त शैक्षणिक गोंधळ नाही. तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शिक्षण खात्यावर थेट व शेलक्या शब्दांत प्रहार करत राज्य शासनाच्या गलथान नियोजनावर संताप व्यक्त केला आहे. निकाल लागल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसेल, तर हा निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची घोर हेळसांड आहे,” असे ते म्हणाले.

प्रशासनाला इशारा अन्यथा आंदोलन

शासनाने तातडीने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण केली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या आणि प्रभावी पद्धतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशाराही ॲड. मातेले यांनी दिला आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि या हक्काशी खेळल्यास, आम्ही रस्त्यावर उतरण्यापासून माघार घेणार नाही!” अशा शब्दांत त्यांनी शासनाला सावध केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

5 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

10 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

12 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

13 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago