राज्य शासनाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त इशारा
मुंबई: राज्यातील दहावी व बारावीचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक CET परीक्षांचे निकालही महिन्याभरापूर्वी जाहीर झाले आहेत. तरीदेखील, अकरावी, तंत्रनिकेतन पदविका, पॉलिटेक्निक, ITI व 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा पूर्ण झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे.
राज्यात सध्या 13 लाख विद्यार्थी प्रवेशासाठी वाट पाहत आहेत. CET सेलने मार्च–एप्रिल महिन्यात तब्बल 18 हून अधिक प्रवेश परीक्षा पार पाडल्या. त्यांचे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच लागले. मात्र अजूनही त्या निकालांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी करण्यात आलेला नाही.
दहावी परीक्षेत यंदा 15 लाख 33 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, परंतु अकरावी प्रवेशासाठी फक्त 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना आता फक्त पहिली फेरी संपल्यानंतर अर्ज करण्याची परवानगी आहे.त्यामुळे या लाखो विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक महिना वाया गेला असून त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे फक्त शैक्षणिक गोंधळ नाही. तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शिक्षण खात्यावर थेट व शेलक्या शब्दांत प्रहार करत राज्य शासनाच्या गलथान नियोजनावर संताप व्यक्त केला आहे. निकाल लागल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसेल, तर हा निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची घोर हेळसांड आहे,” असे ते म्हणाले.
प्रशासनाला इशारा अन्यथा आंदोलन
शासनाने तातडीने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण केली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या आणि प्रभावी पद्धतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशाराही ॲड. मातेले यांनी दिला आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि या हक्काशी खेळल्यास, आम्ही रस्त्यावर उतरण्यापासून माघार घेणार नाही!” अशा शब्दांत त्यांनी शासनाला सावध केले.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…