महाराष्ट्र

पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी ॲड अंजली बांदल यांचा ३,२३९ मताने दणदणीत विजय

वाघोली (प्रतिनिधी): पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत खजिनदारपदासाठी ॲड अंजली बांदल यांनी सर्वाधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये बुधवारी (दि ४) फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर गुरुवारी (दि ५) फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.

या अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी निवडणुकीत ॲड अंजली बांदल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत तब्बल ५,२७४ मते मिळवली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ३,२३९ मतांचे मोठे मताधिक्य मिळवत त्यांनी खजिनदारपदी निर्विवाद विजय संपादन केला. पुणे बार असोसिएशनच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्यांपैकी हा एक विजय मानला जात असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या निकालातून वकिल बांधवांनी ॲड बांदल यांच्या कार्यशैलीवर, पारदर्शकतेवर आणि नेतृत्वक्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा बार असोसिएशनमध्ये होत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने वकिलांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे लोकशाही प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ॲड बांदल यांच्या या विजयामुळे बार असोसिएशनच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्तबद्ध कारभाराला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा वकिल वर्गातून व्यक्त केली जात आहे.

“पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी मला सर्वाधिक मताधिक्याने विजयी केल्याबद्दल सर्व वकील बांधवांचे मनःपूर्वक आभार. ही निवड माझ्या कामावर आणि पारदर्शक कारभारावर दाखवलेला विश्वास आहे. खजिनदार म्हणून संघटनेचा आर्थिक कारभार अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सदस्यांच्या हिताचा ठेवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीत मला मोलाची साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे, ज्येष्ठ वकील मंडळींचे आणि मित्रपरिवाराचे विशेष आभार. पुणे बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी मी नव्या कार्यकारिणीसोबत समन्वयाने काम करणार आहे.”

ॲड अंजली बांदल (खजिनदार)

पुणे बार असोसिएशन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

5 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

5 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

5 तास ago