वाघोली (प्रतिनिधी): पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत खजिनदारपदासाठी ॲड अंजली बांदल यांनी सर्वाधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये बुधवारी (दि ४) फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर गुरुवारी (दि ५) फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.
या अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी निवडणुकीत ॲड अंजली बांदल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत तब्बल ५,२७४ मते मिळवली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ३,२३९ मतांचे मोठे मताधिक्य मिळवत त्यांनी खजिनदारपदी निर्विवाद विजय संपादन केला. पुणे बार असोसिएशनच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्यांपैकी हा एक विजय मानला जात असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या निकालातून वकिल बांधवांनी ॲड बांदल यांच्या कार्यशैलीवर, पारदर्शकतेवर आणि नेतृत्वक्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा बार असोसिएशनमध्ये होत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने वकिलांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे लोकशाही प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ॲड बांदल यांच्या या विजयामुळे बार असोसिएशनच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्तबद्ध कारभाराला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा वकिल वर्गातून व्यक्त केली जात आहे.
“पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी मला सर्वाधिक मताधिक्याने विजयी केल्याबद्दल सर्व वकील बांधवांचे मनःपूर्वक आभार. ही निवड माझ्या कामावर आणि पारदर्शक कारभारावर दाखवलेला विश्वास आहे. खजिनदार म्हणून संघटनेचा आर्थिक कारभार अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सदस्यांच्या हिताचा ठेवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीत मला मोलाची साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे, ज्येष्ठ वकील मंडळींचे आणि मित्रपरिवाराचे विशेष आभार. पुणे बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी मी नव्या कार्यकारिणीसोबत समन्वयाने काम करणार आहे.”
ॲड अंजली बांदल (खजिनदार)
पुणे बार असोसिएशन
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…