मुलीच्या जन्मानंतर पालकांना मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या…

मुंबई: मुलींच्या प्रगतीसाठी सरकारकडून अनेक सरकारी योजना चालवल्या जातात. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलत आहे. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाच्या योजनेद्वारे चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर सरकार ५० हजार रुपये देते.

माझी कन्या भाग्यश्री योजना

१ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. मुलींच्या आकडेवारीत सुधारणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. कुटुंबात दोन मुली असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

कोण घेऊ शकतो फायदा

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मिळू शकतो. या योजनेंतर्गत आई आणि मुलीच्या नावे बँकेत जॉईंट खाते उघडले जाते आणि त्यावर १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केला जातो.

याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी करून घेतल्यास ५० हजार रुपये दिले जातात. दुसरीकडे, दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली, तर दोन्ही मुलींच्या नावावर २५ हजार रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

आवश्यक कागदपत्रे

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत तिसरे मूल असले तरी केवळ दोन मुलींनाच लाभ दिला जाणार आहे.

असा अर्ज करायचा…

महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

येथे तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

अर्ज डाउनलोड केल्यानंतर, फॉर्म पूर्णपणे भरावा लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावी लागतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

6 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

12 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

13 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

13 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

13 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

13 तास ago