महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा..

औरंगाबाद: मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे.

लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे जि. प. सीईओंवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओंची उपस्थिती होती. शिक्षण, आरोग्य, सामाजिक वनीकरणासह अनेक विषयांवर चर्चा झाली. अध्ययन स्तर शोधल्यावर उपाय करण्याचा डाटा समोर येईल. त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षित करून अपडेट करण्यात येईल.

मराठवाड्यात ८ ते १० हजार जि. प. शाळा

ऑगस्ट २०२२ मध्ये लातूर जि. प.ने गुणवत्तावाढीसाठी प्रयोग केला होता. तो प्रयोग मराठवाड्यातील ८ ते १० हजार जि. प. शाळा व ३५ हजारांच्या आसपास शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे. लातूरच्या धर्तीवर पूर्ण विभागात बेसलाईन असेसमेंट करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आजची परिस्थिती, चार महिन्यांनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन होईल. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग करण्यात येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

18 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

18 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

22 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago