शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासत मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली.
सरवणकर म्हणाले की, “माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. मतदार माझ्यासोबत होते, मात्र भाजपच्या स्थानिक यंत्रणेने जाणीवपूर्वक मदत रोखली.”
भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे सरवणकरांना मदत करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. वरून आदेश आल्याचा भास निर्माण करून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा प्रकार केवळ महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून लोकसभा निवडणुकीपासूनच अशीच टोळी सक्रिय असल्याचा दावा सरवणकर यांनी केला. लोकसभेत शीतल गंभीर यांच्या पराभवासाठीही हीच यंत्रणा कार्यरत होती, मात्र तरीही त्यांचा विजय झाला, असे त्यांनी सांगितले.
दादर-माहीम परिसरातील निकालांवरून जनता कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते, असे सांगत सरवणकर यांनी भाजपने युतीधर्म पाळला असता तर आज ही वेळ आली नसती, असा टोला लगावला.
या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या तक्रारीनंतर भाजप त्या संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…