शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासत मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली.
सरवणकर म्हणाले की, “माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. मतदार माझ्यासोबत होते, मात्र भाजपच्या स्थानिक यंत्रणेने जाणीवपूर्वक मदत रोखली.”
भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे सरवणकरांना मदत करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. वरून आदेश आल्याचा भास निर्माण करून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा प्रकार केवळ महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून लोकसभा निवडणुकीपासूनच अशीच टोळी सक्रिय असल्याचा दावा सरवणकर यांनी केला. लोकसभेत शीतल गंभीर यांच्या पराभवासाठीही हीच यंत्रणा कार्यरत होती, मात्र तरीही त्यांचा विजय झाला, असे त्यांनी सांगितले.
दादर-माहीम परिसरातील निकालांवरून जनता कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते, असे सांगत सरवणकर यांनी भाजपने युतीधर्म पाळला असता तर आज ही वेळ आली नसती, असा टोला लगावला.
या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या तक्रारीनंतर भाजप त्या संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…