महाराष्ट्र

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासत मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली.

सरवणकर म्हणाले की, “माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. मतदार माझ्यासोबत होते, मात्र भाजपच्या स्थानिक यंत्रणेने जाणीवपूर्वक मदत रोखली.”

भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे सरवणकरांना मदत करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. वरून आदेश आल्याचा भास निर्माण करून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हा प्रकार केवळ महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून लोकसभा निवडणुकीपासूनच अशीच टोळी सक्रिय असल्याचा दावा सरवणकर यांनी केला. लोकसभेत शीतल गंभीर यांच्या पराभवासाठीही हीच यंत्रणा कार्यरत होती, मात्र तरीही त्यांचा विजय झाला, असे त्यांनी सांगितले.

दादर-माहीम परिसरातील निकालांवरून जनता कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते, असे सांगत सरवणकर यांनी भाजपने युतीधर्म पाळला असता तर आज ही वेळ आली नसती, असा टोला लगावला.

या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या तक्रारीनंतर भाजप त्या संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

2 मिनिटे ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

11 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

55 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

58 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

1 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

1 तास ago