मुंबई: मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला महापौर निवडीसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. जरी संख्याबळाच्या दृष्टीने हे कठीण वाटत असले, तरी ते अशक्य मुळीच नाही. भाजपसोबत मनभेद मागे ठेवून जुळवून घेतल्यास भाजपकडूनही सकारात्मक पाऊल टाकले जाऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ‘देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा (उबाठा) महापौर नक्कीच होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नैसर्गिक युतीकडे म्हणजेच भाजपकडे पाहिले पाहिजे. शिवसेना–भाजप ही नैसर्गिक युती पुन्हा एकदा महाराष्ट्रवासियांना पाहायला मिळावी, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेना फोडून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांच्या बळावर अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद मिळावे, असा आग्रह धरल्याचे समोर आले आहे. मात्र, गेल्या काही काळात भाजप आणि शिंदे गटातील वाढलेले अंतर, तसेच निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेविरोधात केलेला प्रचार लक्षात घेता, शिंदे गटाला बाजूला सारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा हेमंत पाटील यांनी केला.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…