मुंबई: मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला महापौर निवडीसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. जरी संख्याबळाच्या दृष्टीने हे कठीण वाटत असले, तरी ते अशक्य मुळीच नाही. भाजपसोबत मनभेद मागे ठेवून जुळवून घेतल्यास भाजपकडूनही सकारात्मक पाऊल टाकले जाऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ‘देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा (उबाठा) महापौर नक्कीच होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नैसर्गिक युतीकडे म्हणजेच भाजपकडे पाहिले पाहिजे. शिवसेना–भाजप ही नैसर्गिक युती पुन्हा एकदा महाराष्ट्रवासियांना पाहायला मिळावी, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेना फोडून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांच्या बळावर अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद मिळावे, असा आग्रह धरल्याचे समोर आले आहे. मात्र, गेल्या काही काळात भाजप आणि शिंदे गटातील वाढलेले अंतर, तसेच निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेविरोधात केलेला प्रचार लक्षात घेता, शिंदे गटाला बाजूला सारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा हेमंत पाटील यांनी केला.
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…