महाविकास आघाडीचे पक्के पाऊल, जनतेचा प्रचंड प्रतिसाद
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी, स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलकाताई सुरेश खांडरे यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने शिरूरच्या राजकारणात सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये “अनुभवी नेतृत्व पुन्हा मिळणार” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.अलकाताई खांडरे यांनी दोन कार्यकाळ नगरसेविका आणि दोन वेळा उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना शिरूर शहरातील नागरी सोयीसुविधांना नवा चेहरा दिला.
रस्ते-विस्तारीकरण, डांबरीकरण, उद्याने विकास, शहरसुशोभीकरण, स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन, बसस्थानक परिसर विकास, विजेच्या मूलभूत सुविधांचा विस्तार अशा अत्यावश्यक विषयांवर त्यांनी केलेल्या कामांचा शहराच्या विकासात मोलाचा वाटा आहे. त्याच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय आजही शहरात ‘टिकाऊ विकासाचे आदर्श’ म्हणून ओळखले जातात.
धारीवाल परिवार आणि वरिष्ठ नेते यांचे मार्गदर्शन विकासाला गती….
उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल तसेच माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अलकाताई खांडरे यांनी शहरात अनेक पायाभूत प्रकल्प राबवले. आंबेडकर उद्यान, नागरिकांसाठी सुविधावाढ, शहरातील लहान-मोठ्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद या सर्व गोष्टींसाठी त्यांचा विशेष पुढाकार नागरिकांनी कौतुकाने मान्य केला आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात अलकाताई खांडरे यांनी दाखवलेला सेवाभाव, मदतीसाठीची तत्परता आणि प्रशासनाशी समन्वय ही त्यांची खरी ओळख बनली. रुग्णांना तातडीची मदत, अन्नधान्य सहाय्य, मोफत आधार-रेशनकार्ड सेवा, अल्पदरातील अपघाती विमे, वैद्यकीय साहित्य उपलब्धता अशा उपक्रमांमुळे त्यांच्या सेवाभावी प्रतिमेला जनता विशेष मान देते. अलकाताईंच्या कार्यकाळात शहरातील शिक्षणव्यवस्था, आरोग्य सुविधा, रस्ते-विज-पाणी या मूलभूत गरजांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व शिरूरला मिळाले. नगरपरिषद प्रशासनात पारदर्शकता आणि कामकाजातील गती यांना त्यांनी दिलेले प्राधान्य हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. उमेदवारी जाहीर होताच विविध प्रभागांमधील दौऱ्यांमध्ये अलकाताईंना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, कामगार वर्ग या सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना अधिक बळकट होत आहे.“अनुभवी, स्वच्छ प्रतिमेची नेत्री पुन्हा नगराध्यक्ष झाल्यास शिरूरचा विकास अधिक वेगाने होईल” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराला नवी उंची…
महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनामुळे अलकाताईंचा प्रचार अधिक संघटित, जोरदार आणि प्रभावीपणे राबवला जात आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली अलकाताईंच्या प्रचाराला आलेली गती आणि वातावरण पाहता आगामी निवडणुकीत त्या मोठी आघाडी घेतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नगरसेविका व उपनगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी, कोरोना काळातील निस्वार्थ सेवा, विकासाभिमुख भूमिका आणि स्वच्छ राजकीय प्रतिमेमुळे अलकाताई खांडरे या नागरिकांच्या अपेक्षांची नैसर्गिक निवड बनल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे शिरूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…