महाराष्ट्र

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी वसुलीसाठी समांतर यंत्रणा उभी केली आहे. “राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतले जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

चंद्रपूर येथील मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मार्फत झालेली कारवाई ही पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. तक्रारदाराच्या प्रवासातील विसंगती आणि टोल नोंदीतील तफावत यावरून हे प्रकरण बनावट असल्याचे त्यांनी सूचित केले.

विदर्भातील ६४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींची मर्जी न झाल्याने त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत, “जे अधिकारी वसुलीला नकार देतात त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवले जाते किंवा बदलीची धमकी दिली जाते,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

याशिवाय, अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासाच्या कथित गैरवापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही जण तंत्र-मंत्राचा आधार घेत सत्तास्थानी टिकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, “संविधानाची शपथ घेणाऱ्यांना हे शोभणारे नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

पुणे जमीन घोटाळा असो किंवा आरटीओमधील वसुली प्रकरण—सरकार मोठ्या आरोपींना वाचवत असून केवळ लहान अधिकाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “सरकारमध्ये अंतर्गत गटबाजी आणि गँगवॉर सुरू असून त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे,” असेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

6 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

12 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

12 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

13 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

13 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago