महाराष्ट्र

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी वसुलीसाठी समांतर यंत्रणा उभी केली आहे. “राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतले जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

चंद्रपूर येथील मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मार्फत झालेली कारवाई ही पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. तक्रारदाराच्या प्रवासातील विसंगती आणि टोल नोंदीतील तफावत यावरून हे प्रकरण बनावट असल्याचे त्यांनी सूचित केले.

विदर्भातील ६४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींची मर्जी न झाल्याने त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत, “जे अधिकारी वसुलीला नकार देतात त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवले जाते किंवा बदलीची धमकी दिली जाते,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

याशिवाय, अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासाच्या कथित गैरवापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही जण तंत्र-मंत्राचा आधार घेत सत्तास्थानी टिकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, “संविधानाची शपथ घेणाऱ्यांना हे शोभणारे नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

पुणे जमीन घोटाळा असो किंवा आरटीओमधील वसुली प्रकरण—सरकार मोठ्या आरोपींना वाचवत असून केवळ लहान अधिकाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “सरकारमध्ये अंतर्गत गटबाजी आणि गँगवॉर सुरू असून त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे,” असेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

20 मिनिटे ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

10 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

10 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

10 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

10 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

10 तास ago