महाराष्ट्र

महाराष्ट्रात सुधारित ‘शक्ती’ कायदा मंजूर; डिजिटल छळ व ॲसिड हल्ल्यांवर कडक कारवाई

महिला सुरक्षेसाठी मोठे पाऊल; BNS मध्ये राज्याच्या विशेष दुरुस्त्या समाविष्ट

मुंबई: महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी सुधारित ‘शक्ती’ कायदा अखेर मंजूर करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता मध्ये राज्यस्तरीय दुरुस्ती करून या कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला असून, ‘भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६’ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या ‘शक्ती’ कायद्यातील बहुतांश तरतुदी केंद्राच्या BNS कायद्यात समाविष्ट झाल्या असल्या, तरी उर्वरित महत्त्वाच्या बाबी राज्य दुरुस्तीद्वारे लागू करण्यात येत आहेत.

प्रमुख तरतुदी

डिजिटल छळावर कडक कारवाई: सोशल मीडिया, ईमेल किंवा इतर डिजिटल माध्यमांतून महिलांची बदनामी, धमकी, अश्लील संवाद किंवा डीपफेक (AI आधारित फोटो/व्हिडिओ) तयार करणे व प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा ठरणार. दोषींना तुरुंगवास व दंडाची तरतूद.

ॲसिड हल्ला पीडितांची ओळख गुप्त: पीडित महिलेची ओळख उघड केल्यास कायदेशीर कारवाई.

कठोर शिक्षा: बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांत मृत्युदंड, जन्मठेप व ५ ते १० लाख रुपयांपर्यंत दंड.

जलद न्याय प्रक्रिया: तपास ३० दिवसांत पूर्ण करून ६० दिवसांत विशेष न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद.

डिजिटल गुन्ह्यांना ‘लैंगिक गुन्हा’चा दर्जा

नवीन दुरुस्तीनुसार, डिजिटल माध्यमातून महिलांची बदनामी केवळ मानहानी न ठरता ‘लैंगिक गुन्ह्या’च्या कक्षेत येणार आहे. विशेषतः डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेले फोटो किंवा व्हिडिओ पसरवणे अथवा त्याची धमकी देणे यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

राज्य सरकारचा दावा

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुधारणा अत्यंत महत्त्वाची असून, डिजिटल युगातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला

महाराष्ट्र विधानसभेने यापूर्वी ‘शक्ती’ कायदा मंजूर केला होता. मात्र, केंद्राने नवीन भारतीय न्याय संहिता लागू केल्यानंतर दोन्ही कायद्यांमध्ये तांत्रिक संघर्ष टाळण्यासाठी राज्याने सुधारित विधेयकाच्या माध्यमातून आवश्यक तरतुदी समाविष्ट केल्या.

महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल

गेल्या काही काळात सोशल मीडियाद्वारे महिलांना धमकावणे, बदनामी करणे आणि त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

9 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

9 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

9 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

9 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

9 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

9 तास ago