महाराष्ट्र

अंबादास दानवेंचा विधान परिषदेतून निरोप

मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. या निमित्ताने विधान परिषदेत आज त्यांचा निरोप समारंभ पार पडला. अंबादास दानवे ऑगस्ट २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर, ऑगस्ट २०२२ मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि विधान परिषदेचे अधिवेशन शुक्रवारी संपत असताना, आज त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

अंबादास दानवे हे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात त्यांनी ठाकरे गटाची बाजू अत्यंत हिरीरीने आणि आक्रमकपणे मांडली आहे. आता ते विधान परिषदेत नसल्याने, आगामी काळात ठाकरे गटाला अशा आक्रमक नेत्याची उणीव भासण्याची शक्यता आहे.

अंबादास दानवेंच्या विधान परिषदेतील पुनरागमनाचा मार्ग खडतर

अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे ते पुन्हा सभागृहात दिसणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाकडून विधान परिषदेत निवडून येणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्याच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेच्या या जागेसाठी निवडणूक होईल. तोपर्यंत अंबादास दानवे यांना वाट पाहावी लागेल.

विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार आहे. मात्र, विधानसभा सदस्यांमधून निवडून येण्यासाठी ठाकरे गटाकडे सध्या केवळ २० आमदारांचे संख्याबळ आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा निवडून येण्यासाठी किमान ४० ते ४५ विधानसभा सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

3 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

5 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

10 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

10 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

10 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

10 तास ago