मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आज मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांआधीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (23 ऑगस्ट) अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या भेटीत अमित ठाकरे मंत्री आशिष शेलार यांच्यासह काय चर्चा करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतलेली
राज ठाकरे 21 ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी गेले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिली. गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, असं राज ठाकरेंनी सांगितले.
मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले. आपल्याकडे जागांचा विचार केला तर कुंपणच शेत खात आहे. अर्बन नक्षल पेक्षा येथे शिस्त लावा. खोट्या रिक्षा आहे, टॅक्सी आहेत, त्यावर कुठलाही निर्बंध नाहीय, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…