मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आज मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांआधीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (23 ऑगस्ट) अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या भेटीत अमित ठाकरे मंत्री आशिष शेलार यांच्यासह काय चर्चा करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतलेली
राज ठाकरे 21 ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी गेले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिली. गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, असं राज ठाकरेंनी सांगितले.
मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले. आपल्याकडे जागांचा विचार केला तर कुंपणच शेत खात आहे. अर्बन नक्षल पेक्षा येथे शिस्त लावा. खोट्या रिक्षा आहे, टॅक्सी आहेत, त्यावर कुठलाही निर्बंध नाहीय, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…