महाराष्ट्र

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली.

“तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या घरांसाठीचा निधीच मिळालेला नाही. अनेकांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरांची बांधकामे सुरू केली; परंतु हप्ते न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत.

“सरकारकडून प्रत्येकवेळी ‘लवकरच निधी देऊ’ असे उत्तर दिले जाते. पण हा ‘लवकर’ नेमका कधी येणार?” असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

“तीन पावसाळे कसे काढले?”

तीन वर्षांपासून निधी रखडल्याने लाभार्थ्यांनी सलग तीन पावसाळे कसे काढले असतील, याची सरकारला जाणीव आहे का? हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार का? असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारकडून ठोस भूमिका मागितली.

विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

घरकुल योजनेबाबतच्या या चर्चेची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. केंद्र शासनाकडून या उपक्रमासाठी किती निधी अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार, याबाबत सविस्तर माहिती घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी संपूर्ण अहवाल सभागृहासमोर सादर करावा, असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.

घरकुल योजनेतील निधीविषयक प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली असून, आता सरकारकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.…

10 मिनिटे ago

जागतिक MSME दिनानिमित्त वाशीत ‘महाराष्ट्र MSME परिषद व पुरस्कार 2026’

मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…

4 तास ago

श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट…

4 तास ago

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची…

5 तास ago

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

स्वतंत्र चौकशीची अमोल मातेले यांची मागणी मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही केवळ…

5 तास ago

शिरूर! घोडनदी किनारी गावठी हातभट्टीवर छापा; मुद्देमाल जप्त, दोघे फरार…

शिरूर : शिरूर पोलिसांनी निमोणे गावाच्या हद्दीतील भोसेवाडी परिसरात घोडनदी किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर…

5 तास ago