मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली.
“तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.
राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या घरांसाठीचा निधीच मिळालेला नाही. अनेकांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरांची बांधकामे सुरू केली; परंतु हप्ते न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत.
“सरकारकडून प्रत्येकवेळी ‘लवकरच निधी देऊ’ असे उत्तर दिले जाते. पण हा ‘लवकर’ नेमका कधी येणार?” असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
“तीन पावसाळे कसे काढले?”
तीन वर्षांपासून निधी रखडल्याने लाभार्थ्यांनी सलग तीन पावसाळे कसे काढले असतील, याची सरकारला जाणीव आहे का? हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार का? असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारकडून ठोस भूमिका मागितली.
विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
घरकुल योजनेबाबतच्या या चर्चेची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. केंद्र शासनाकडून या उपक्रमासाठी किती निधी अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार, याबाबत सविस्तर माहिती घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी संपूर्ण अहवाल सभागृहासमोर सादर करावा, असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.
घरकुल योजनेतील निधीविषयक प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली असून, आता सरकारकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार…
नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत…
जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून…
मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे…