महाराष्ट्र

कॉपी करणाऱ्यांनो सावधान! परीक्षा केंद्रांवर नवे नियम लागू

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झाला आहे.  विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पाऊल

राज्यातील सुमारे ३१ लाख विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी मंडळाने हे नवे धोरण अमलात आणले आहे. यामुळे परीक्षा केंद्रांवरील निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे.

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह:

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत २० ते २६ जानेवारी दरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताह m राबविण्यात येणार आहे.

सप्ताहातील मुख्य उपक्रम:

शपथविधी: शिक्षक-विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ

मार्गदर्शन वर्ग: परीक्षेतील तणाव कमी करण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले

कॉपीचे दुष्परिणाम: m शिक्षेबाबत जागरूकता

आरोग्य सल्ला: परीक्षा काळातील आहार आणि आरोग्याविषयी माहिती

जागृती रॅली आणि ग्रामसभा: विद्यार्थ्यांत आणि पालकांत जनजागृती

यंदाच्या परीक्षांसाठीचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देईल. *”कॉपीमुक्त भारताच्या दिशेने एक पाऊल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

9 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

10 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

10 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

11 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

11 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

15 तास ago