दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पाऊल
राज्यातील सुमारे ३१ लाख विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी मंडळाने हे नवे धोरण अमलात आणले आहे. यामुळे परीक्षा केंद्रांवरील निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे.
कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह:
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत २० ते २६ जानेवारी दरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताह m राबविण्यात येणार आहे.
सप्ताहातील मुख्य उपक्रम:
शपथविधी: शिक्षक-विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ
मार्गदर्शन वर्ग: परीक्षेतील तणाव कमी करण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले
कॉपीचे दुष्परिणाम: m शिक्षेबाबत जागरूकता
आरोग्य सल्ला: परीक्षा काळातील आहार आणि आरोग्याविषयी माहिती
जागृती रॅली आणि ग्रामसभा: विद्यार्थ्यांत आणि पालकांत जनजागृती
यंदाच्या परीक्षांसाठीचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देईल. *”कॉपीमुक्त भारताच्या दिशेने एक पाऊल.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…