महाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. अनेक नेते, पदाधिकारी पक्षाची साथ सोडत आहेत. भाजपने या निवडणुकीपूर्वी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक पक्षाची नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशामध्ये आता भाजपलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच एका बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे शक्तीबुथ केंद्र प्रमुख आणि उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हेमंत जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओद्वारे त्यांनी पक्षाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुठलेही काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

हेमंत जाधव म्हणता की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की मी इथून पुढे भारतीय जनता पार्टीचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही. याची कारणं बरीच आहेत आणि याचा मी बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये मला कधीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वैयक्तिक कारणासाठी अजिबात नाही. ज्या कारणासाठी मी भाजपसोबत काम करत होतो. पार्टी त्यापैकी कुठलंही काम करायला तयार नाही. त्यामुळेच मी या पदाचा राजीनामा देत भाजपसोबत काम करायचे नाही हे जाहीर करत आहे.’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते लातूर विमानतळावर दाखल झाले. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हसते लातूर जिल्हा परिषद प्रांगणातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याचसोबत ते आज लातूर जिल्हा विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ही बैठक होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

13 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

22 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

22 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

23 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago