मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन e-KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देत, e-KYC करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याबाबत दिलासा दिला आहे.
e-KYC करताना नेमकी अडचण काय झाली?
अदिती तटकरे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.”
मात्र, अनेक महिलांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला, तांत्रिक बाबींचे अज्ञान किंवा प्रणालीतील मर्यादांमुळे त्यांचे अर्ज अपूर्ण अथवा चुकीचे ठरले. परिणामी, जानेवारी महिन्यात काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही.
आता काय निर्णय घेण्यात आला आहे?
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अदिती तटकरेंनी स्पष्ट केले की,“e-KYC प्रक्रियेत चूक झालेल्या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष (Physical Verification) करण्यात येणार आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.”यामुळे e-KYC मधील तांत्रिक चुका दुरुस्त होऊन पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दुरुस्तीचा पर्यायच नव्हता, ही मोठी अडचण
महत्त्वाची बाब म्हणजे,
एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर
किंवा e-KYC पूर्ण झाल्यानंतर
पोर्टलवर कोणताही ‘Edit’ किंवा ‘Correction’चा पर्याय उपलब्ध नव्हता.
यामुळे अनेक महिलांचा अर्ज चुकीमुळे फेटाळला गेला आणि नियमित हप्ता मिळणाऱ्या महिलांचाही लाभ अचानक बंद झाला. याच कारणामुळे राज्यभरात काही ठिकाणी महिलांनी आंदोलनही केले.
महिलांना मोठा दिलासा
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता चुकीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळणार असून, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…