आरोग्य

पावसाळ्याच्या दिवसात उत्पन्न होणाऱ्या सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून.

खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

आव (रक्त पडत नसेल तर): मिरी + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण.

तोंड येणे: जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन: भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा + लिंबू

जंत कृमी: वावडिंगाचे चूर्ण मधातून, कपिल्लाची गोळी गुळातून.

सांधे दुखी: सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक.

मूत्र विकार: धने जिऱ्याचे पाणी, वाळ्याचे सरबत, गोखरूचा काढा.

रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे): लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण.

मानसिक व्यथा (झोप न येणे, चिंता): वेखंडाची पूड हातापायास चोळणे, कांद्याची दह्यातील कोशिंबीर.

पित्त उठणे, अ‍ॅलर्जी: अमसुलाचे पाणी

भाजणे, पोळणे: तूप लावणे

जखमा: स्वच्छ खोबरेल तेल लावणे.

दातदुखी: तुपाचा बोळा लावणे.

कानदुखी: लसणीचे तेल कानात घालणे.

त्वचेचे सामान्य विकार: हळदीचा लेप गोमूत्रातून, पोटात हिरडा उगाळून, तुळशीचा रस लावण्यासाठी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

2 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

10 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

19 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

20 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

20 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

20 तास ago