महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील २०,३१० रेशनधारकांचे धान्य बंद

शासकीय कर्मचारी, मृत लाभार्थी व सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हजार ३१० रेशनधारकांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिकांचा या कारवाईत समावेश आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला अन्नसुरक्षाअंतर्गत धान्य दिले जाते. यामध्ये केशरी, पिवळे आणि पांढरे अशा तीन प्रकारच्या शिधापत्रिकांचा समावेश आहे. केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानातून नियमित धान्य वितरित केले जाते. मात्र, यापैकी अनेक लाभार्थी हे शासकीय कर्मचारी असून त्यांची आर्थिक स्थिती सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ धान्य उचललेले नव्हते.

गेल्या काही वर्षांपासून आधार संलग्नता व बोटाचे ठसे (बायोमेट्रिक प्रणाली) वापरून धान्य वितरण होत असल्याने कोणत्या लाभार्थ्याने किती काळ धान्य घेतलेले नाही, याची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. याच माहितीच्या आधारे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र किंवा धान्य न घेणाऱ्या रेशनधारकांची यादी जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली.

या यादीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने २०,३१० रेशनधारकांचे धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापैकी कोणी पात्र लाभार्थी असल्याचा दावा करत पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यास, निकष तपासून त्यांच्या रेशनची सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

6 तास ago

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…

6 तास ago

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

7 तास ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

7 तास ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

7 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

7 तास ago