महाराष्ट्र

सोमवारी महाराष्ट्र बंद! सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात मोठा एल्गार

मुंबई: राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारच्या कर धोरणांविरुद्ध इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने 14 जुलै 2025 बंद पुकारला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे.

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की, सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे. त्यामुळे ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. त्याचबरोबर परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात 60 % वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंदची घोषणा करण्यात आली आहे.

बार चालकांमध्ये नाराजी

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संघटनांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, ही करवाढ व्यवसायासाठी हानिकारक आहे, त्याचबरोबर लहान आणि मध्यम दर्जाच्या हॉटेल्स आणि बार चालवणे कठीण बनले आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्यांवर आणि लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, सरकारचे कर धोरण अन्यायकारक आहे. आम्ही याबाबत प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली आहे, मात्र आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही राज्यव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण राज्यावर परिणाम होणार

14 जुलै असणाऱ्या बंदचा परिणाम संपूर्ण राज्यावर होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये बंदचा परिणाम जाणवणार आहे. सोमवारी सर्व परमिट रूम, बार आणि मद्यपान विक्री करणारे हॉटेल-रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. हा बंद शांततेत असणार आहे, मात्र जर सरकारने दखल घेतली नाही तर आगामी काळात हिंसक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा बंद राजकीय चळवळ नसून आणच्या उद्योगाच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. आम्ही सरकारकडून न्याय्य कर धोरणाची मागणी करत आहोत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही संघटनेने म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

18 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

18 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

19 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

19 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

2 दिवस ago