महाराष्ट्र

अंगणवाडी-आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; EPF आणि पेन्शनचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा निर्णय दिला असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या निर्णयानुसार विविध सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ९ हजार १५ कर्मचाऱ्यांना EPF आणि पेन्शन योजना लागू होणार आहे. आरोग्य, पोषण तसेच महिला-बालकल्याण क्षेत्रात अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती.

निर्णयानुसार कर्मचारी आणि नियुक्ती करणाऱ्या आस्थापनांचे योगदान मिळून जवळपास १ हजार ८४ कोटी १३ लाख रुपये येत्या ६० दिवसांत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे.

अंगणवाडी आणि आशा कर्मचारी अनेक वर्षांपासून पूर्णवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करत असले तरी त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. सरकारी योजनांत काम करत असल्याने खासगी क्षेत्राचे नियम लागू होत नव्हते, तर कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे सरकारी PF चा लाभही मिळत नव्हता.

या प्रकरणात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) या कामगार संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. संघटनेचे अध्यक्ष अजित अभ्यंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा दिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे सादर केलेल्या मुद्द्यांवरून हा निर्णय देण्यात आला.पत्रकार परिषदेत आशा कर्मचारी संघटनेच्या किरण मोघे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम आणि उपाध्यक्ष रजनी पिसाळ उपस्थित होत्या.

दरम्यान, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्यात EPF आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

5 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

5 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

5 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

7 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

7 तास ago