महाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न; मोदींनी जाहीर माफी मागावी

मुंबई: सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने वाराणसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवून इतिहास पुसण्याचे घोर पाप केले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, अहिल्यादेवींच्या ३०० व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत एकीकडे भाजप सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे त्यांच्या स्मृतींचेच उच्चाटन केले जात आहे. हा भाजपाचा दुटप्पीपणा असून हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाचा खरा चेहरा उघडा पडला आहे.

नरेंद्र मोदींच्या अंगात गझनीचे भूत शिरले असून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. या प्रकाराविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

धनगर समाजाचा अपमान; २७ तारखेपर्यंत माफी नाही तर आंदोलन – यशपाल भिंगे

यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे म्हणाले की, १७७१ मध्ये अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर १० जानेवारी रोजी बुलडोझर चालवण्यात आला व त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार धनगर समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारा आहे. नरेंद्र मोदींनी २७ जानेवारीपर्यंत जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते यावर मौन का बाळगून आहेत, असा सवालही भिंगे यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणनिती ठरली

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महानगरपालिका व नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांतही समविचारी पक्षांशी आघाडी केली जाईल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) सोबत आघाडी होणार नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीसोबतची युती ही केवळ आकड्यांची नव्हे तर वैचारिक असल्याचे सांगत, त्यावर होणारी टीका एकांगी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

27 मिनिटे ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

2 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

15 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

15 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

15 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

15 तास ago