मुंबई: सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने वाराणसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवून इतिहास पुसण्याचे घोर पाप केले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, अहिल्यादेवींच्या ३०० व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत एकीकडे भाजप सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे त्यांच्या स्मृतींचेच उच्चाटन केले जात आहे. हा भाजपाचा दुटप्पीपणा असून हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाचा खरा चेहरा उघडा पडला आहे.
नरेंद्र मोदींच्या अंगात गझनीचे भूत शिरले असून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. या प्रकाराविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
धनगर समाजाचा अपमान; २७ तारखेपर्यंत माफी नाही तर आंदोलन – यशपाल भिंगे
यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे म्हणाले की, १७७१ मध्ये अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर १० जानेवारी रोजी बुलडोझर चालवण्यात आला व त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार धनगर समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारा आहे. नरेंद्र मोदींनी २७ जानेवारीपर्यंत जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते यावर मौन का बाळगून आहेत, असा सवालही भिंगे यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणनिती ठरली
काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महानगरपालिका व नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांतही समविचारी पक्षांशी आघाडी केली जाईल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) सोबत आघाडी होणार नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीसोबतची युती ही केवळ आकड्यांची नव्हे तर वैचारिक असल्याचे सांगत, त्यावर होणारी टीका एकांगी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…