महाराष्ट्र

निवडणुकीआधी भाजप आमदार अडचणीत! घटस्फोट न घेता दुसऱ्या विवाहाचा आरोप

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, खडगपूरचे भाजप आमदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेते हिरण चटर्जी मोठ्या वादात सापडले आहेत. घटस्फोट न घेता प्रसिद्ध मॉडेल रितिका गिरी हिच्याशी वाराणसीत दुसरा विवाह केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

वाराणसीत विवाहाचे फोटो व्हायरल

हिरण चटर्जी आणि रितिका गिरी यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. वाराणसीतील गंगा घाटावर हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह सोहळा पार पडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंमुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पहिल्या पत्नीची पोलिसांत तक्रार

विवाहाचे फोटो समोर येताच हिरण चटर्जी यांची पहिली पत्नी अनिंदिता चटर्जी यांनी आनंदपूर पोलीस ठाण्यात हिरण चटर्जी आणि रितिका गिरी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. अनिंदिता यांचा आरोप आहे की, कायदेशीर घटस्फोट न घेताच हिरण चटर्जी यांनी दुसरे लग्न केले असून, हा विवाह कायद्याने अवैध आहे.

“आमचा विवाह ११ डिसेंबर २००० रोजी झाला असून आम्हाला १९ वर्षांची मुलगी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा मानसिक छळ झाला, मात्र मुलीच्या भविष्यासाठी मी शांत राहिले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच रितिका गिरी ही त्यांच्या मुलीपेक्षा केवळ दोन वर्षांनी मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

‘विवाह लपवलेला नाही’ – रितिका गिरी

दरम्यान, रितिका गिरी हिने या विवाहाचे समर्थन केले आहे.“आमचा विवाह वाराणसीत पवित्र अग्नीच्या साक्षीने झाला आहे. याची माहिती अनिंदिता यांना आधीपासून होती. आम्ही काहीही लपवलेले नाही, आमची सोशल मीडिया खाती सार्वजनिक आहेत,” असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.वाद वाढल्यानंतर हिरण चटर्जी यांनी सोशल मीडियावरून विवाहाचे फोटो हटवले आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ

निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदारावर ओढवलेल्या या वादामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

30 मिनिटे ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

39 मिनिटे ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

43 मिनिटे ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

52 मिनिटे ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

55 मिनिटे ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

57 मिनिटे ago