कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, खडगपूरचे भाजप आमदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेते हिरण चटर्जी मोठ्या वादात सापडले आहेत. घटस्फोट न घेता प्रसिद्ध मॉडेल रितिका गिरी हिच्याशी वाराणसीत दुसरा विवाह केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला आहे.
वाराणसीत विवाहाचे फोटो व्हायरल
हिरण चटर्जी आणि रितिका गिरी यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. वाराणसीतील गंगा घाटावर हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह सोहळा पार पडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंमुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या पत्नीची पोलिसांत तक्रार
विवाहाचे फोटो समोर येताच हिरण चटर्जी यांची पहिली पत्नी अनिंदिता चटर्जी यांनी आनंदपूर पोलीस ठाण्यात हिरण चटर्जी आणि रितिका गिरी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. अनिंदिता यांचा आरोप आहे की, कायदेशीर घटस्फोट न घेताच हिरण चटर्जी यांनी दुसरे लग्न केले असून, हा विवाह कायद्याने अवैध आहे.
“आमचा विवाह ११ डिसेंबर २००० रोजी झाला असून आम्हाला १९ वर्षांची मुलगी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा मानसिक छळ झाला, मात्र मुलीच्या भविष्यासाठी मी शांत राहिले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच रितिका गिरी ही त्यांच्या मुलीपेक्षा केवळ दोन वर्षांनी मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘विवाह लपवलेला नाही’ – रितिका गिरी
दरम्यान, रितिका गिरी हिने या विवाहाचे समर्थन केले आहे.“आमचा विवाह वाराणसीत पवित्र अग्नीच्या साक्षीने झाला आहे. याची माहिती अनिंदिता यांना आधीपासून होती. आम्ही काहीही लपवलेले नाही, आमची सोशल मीडिया खाती सार्वजनिक आहेत,” असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.वाद वाढल्यानंतर हिरण चटर्जी यांनी सोशल मीडियावरून विवाहाचे फोटो हटवले आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदारावर ओढवलेल्या या वादामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…