मुंबई: ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत नाही त्यावरून भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्य रक्षक’ म्हणून संबोधल्यानंतर भाजपने गळा काढायला सुरुवात केली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना हेच भाजपचे चेलेचपाटे कुठे होते असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये भाजप मंत्री करत असताना हेच भाजपचे नेते फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटले नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत मात्र त्यांचा हा दोगलेपणा आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…
पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…