महाराष्ट्र

चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा घोडेबाजार; शिवसेना भूमिकेचे पडसाद राज्यात उमटणार

मुंबई: चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून अवघ्या एका मताने विजय मिळवला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असूनही काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला नाही, उलट भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली, असा आरोप त्यांनी केला.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसकडे ३१ नगरसेवक असताना शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा दिला, तर एमआयएमने तटस्थ भूमिका घेत भाजपाचा मार्ग मोकळा केला. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्यामुळे भाजपाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा आणि एमआयएम यांची अदृश्य युती पुन्हा एकदा उघड झाली आहे. अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूरनंतर आता चंद्रपुरातही हे स्पष्ट झाले आहे. तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदत केली असून भाजपा व एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनी साथ दिली असती तर चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला असता, असेही सपकाळ म्हणाले. महापौरपदासाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले असून पक्षात कोणतीही फूट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात येणार असून त्यानंतर पक्षात सखोल चर्चा केली जाईल, अशी माहितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, “चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने घेतलेल्या भूमिकेचे परिणाम राज्याच्या राजकारणात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत काँग्रेसनेही अशीच भूमिका घ्यायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

3 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

3 तास ago