मुंबई: चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून अवघ्या एका मताने विजय मिळवला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असूनही काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला नाही, उलट भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली, असा आरोप त्यांनी केला.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसकडे ३१ नगरसेवक असताना शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा दिला, तर एमआयएमने तटस्थ भूमिका घेत भाजपाचा मार्ग मोकळा केला. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्यामुळे भाजपाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा आणि एमआयएम यांची अदृश्य युती पुन्हा एकदा उघड झाली आहे. अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूरनंतर आता चंद्रपुरातही हे स्पष्ट झाले आहे. तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदत केली असून भाजपा व एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा घणाघात त्यांनी केला.
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनी साथ दिली असती तर चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला असता, असेही सपकाळ म्हणाले. महापौरपदासाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले असून पक्षात कोणतीही फूट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात येणार असून त्यानंतर पक्षात सखोल चर्चा केली जाईल, अशी माहितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, “चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने घेतलेल्या भूमिकेचे परिणाम राज्याच्या राजकारणात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत काँग्रेसनेही अशीच भूमिका घ्यायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…