महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला महत्त्व नाही पण…

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे फार चालते, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाह्मण समाजाचे नेते आहेत. तरी, गडकरी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नागपूर येथे अल इब्राहिम शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, “शिक्षण ही आपली शक्ती आहे. शिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही समाजाचा विकास होऊ शकत नाही. अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान अशी छोटीमोठी कामे करताना दिसतात. त्यांच्यात चांगले कला कौशल्य असूनही ते केवळ शिक्षणाअभावी मागे पडलेत. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने सर्व भाषांचे शिक्षण घ्यावे.”

नितीन गडकरी म्हणाले, “मी ब्राह्मण आहे. मात्र, इथे (महाराष्ट्रात) ब्राह्मणांचे फार चालत नाही. त्यांना इथे फारशे महत्त्वही नाही. पण, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये त्यांना खूप महत्त्व आहे. तिकडे दुबे, मिश्रा, पांडे, चतुर्वेदी आदींची खूप चलती असते. त्यांचा तिथे फार मोठा दबदबा आहे. मी एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेलो. तिथे सर्वजण माझ्याकडे आले. म्हणाले, ‘पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आपल्या समाजाचा कुणी दमदार नेता असेल तर ते तुम्ही आहात.’ मी म्हणालो, ‘मीच का?’ त्यांनी म्हटलं, ‘कारण तुम्ही ब्राह्मण आहे.’ मग मी म्हणालो, ‘मी जात-पात मानत नाही. तुम्ही मला हे का सांगत आहात?”

“खरी गोष्ट ही आहे की, लोक तुम्हाला तुमच्या कामाने, कार्याने, गुणवत्तेने, गुणाने कौशल्याने पसंत करतात. मी आता डॉक्टर नाव लावत नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे ७ विश्वविक्रम झालेत. माझा अनुभव असा आहे की, तुम्ही शिक्षणात कितीही चांगले गुण घेतले तरी तुम्ही यशस्वी व्हाल याची कोणतीही खात्री नाही. मी लॉ कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा जे विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि मेरिटमध्ये येत होते, त्यांची वकिली आज फार चालत नाही. मात्र, आमच्यासारखे जे विद्यार्थी बदमाशी करत होते, ते आज खूप मोठे वकील झालेत. ते कोटीत कमाई करत आहेत,” असेही गडकरी यांनी सांगितलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

1 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

4 तास ago

केस गळतीवर घरगुती उपाय

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…

4 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…

4 तास ago

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

15 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

19 तास ago