महाराष्ट्र

ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा होणार पूर्ववत

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षांना सूचना

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्यामुळे सदर बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी PMPML चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याने सदर बससेवा पुन्हा सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना PMPML प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा देखील सुरु झाली. त्यामुळे महामंडळाने PMPML प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय PMPML प्रशासनाने घेतला होता.

सध्या ग्रामीण भागातील 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत नुकतेच अजून 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, PMPML प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत असताना मात्र ग्रामीण भागातील नागरिकांसह शाळकरी मुलांचे हाल होत असल्याने PMPML ची बससेवा सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन PMPML चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुन्हा बससेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना दिलासा मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

15 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

15 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

19 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago