महाराष्ट्र

ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा होणार पूर्ववत

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षांना सूचना

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्यामुळे सदर बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी PMPML चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याने सदर बससेवा पुन्हा सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना PMPML प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा देखील सुरु झाली. त्यामुळे महामंडळाने PMPML प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय PMPML प्रशासनाने घेतला होता.

सध्या ग्रामीण भागातील 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत नुकतेच अजून 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, PMPML प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत असताना मात्र ग्रामीण भागातील नागरिकांसह शाळकरी मुलांचे हाल होत असल्याने PMPML ची बससेवा सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन PMPML चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुन्हा बससेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना दिलासा मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

2 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

4 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

4 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

5 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

15 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

16 तास ago