पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षांना सूचना
शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्यामुळे सदर बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी PMPML चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याने सदर बससेवा पुन्हा सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना PMPML प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा देखील सुरु झाली. त्यामुळे महामंडळाने PMPML प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय PMPML प्रशासनाने घेतला होता.
सध्या ग्रामीण भागातील 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत नुकतेच अजून 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, PMPML प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत असताना मात्र ग्रामीण भागातील नागरिकांसह शाळकरी मुलांचे हाल होत असल्याने PMPML ची बससेवा सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन PMPML चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुन्हा बससेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना दिलासा मिळणार आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…