महाराष्ट्र

जावई सासरच्या संपत्तीत हक्क सांगू शकतो का?

मुंबई: भारतात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. अनेकदा संपत्तीवरून होणारे वाद-विवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरण न्यायालयात येतात. खरे तर भारतात संपत्ती विषयक कायदे अस्तित्वात आहेत मात्र कायद्यातील सर्वच तरतुदी सर्वसामान्यांना समजत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठा गैरसमज तयार होतो.

हेच कारण आहे की आज आपण संपत्तीविषयक कायद्यामधील एका महत्त्वाच्या बागेची माहिती पाहणार आहोत. जसे की आपणास ठाऊकच आहे की भारतीय कायद्याने वडिलांच्या मालमत्तेत मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेला आहे.

मात्र कायद्याने मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिलेला असल्याने जावयाला देखील त्याच्या सासरच्या संपत्तीत काही अधिकार मिळतो का असा प्रश्न उपस्थित होतोय. आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कायदा काय सांगतो?

हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 ज्याला Hindu Succession Act – HSA म्हणून ओळखले जाते या कायद्यानुसार, सासरच्या संपत्तीत जावयाला अधिकार मिळू शकत नाही. खरे तर या कायद्यात वारसा हक्कासाठी वर्ग-1 उत्तराधिकारींची यादी सुद्धा आहे.

या यादीनुसार पत्नी, मुलगा, मुलगी, मृत मुलाचा मुलगा किंवा मुलगी, मृत मुलाची पत्नी व त्यांच्या संततीचा वर्ग एक वारसदारांमध्ये समावेश होतो. मात्र, मुलीचा पती – म्हणजेच जावई – या यादीत येत नाही.

म्हणजेच मुलीच्या लग्नानंतर सुद्धा तिला आपल्या वडिलांच्या संपत्ती पूर्ण अधिकार मिळतो पण तिचा पती त्याच्या सासरच्या संपत्तीत आपोआप हक्कदार होऊ शकत नाही. दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने जावयाला सासरच्या संपत्तीत अधिकार मिळतो की नाही या संदर्भातील एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.

हायकोर्टाचे म्हणणे काय?

केरळ उच्च न्यायालयात एक असेच प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात जावयाने सासरच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी स्वतः पैसे खर्च केले होते. यामुळे जावई त्या घरावर दावा ठोकत होता.

मात्र माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना जावयाला त्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क प्राप्त होत नाही असे सांगत जावयाची याचिका फेटाळून लावली होती.

जावई हा केवळ सासऱ्यांच्या परवानगीने त्यांच्या घरात राहू शकतो आणि जर ती परवानगी सासरच्या लोकांनी मागे घेतली तर त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकारही उरत नाही, असे माननीय केरळ हायकोर्टाने स्पष्ट केले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

5 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

5 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

5 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

6 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

1 दिवस ago