महाराष्ट्र

…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत काल आणि आज दोन भागांमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या मुलाखतीवर सत्ताधारी पक्षांतील अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी करत ‘ठाकरे ब्रँड’ संपला असल्याचे म्हटले आहे.

७ ते ८ खासदार…

याचबरोबर गिरीश महाजन यांनी एक खळबळजनक दावा केला असून त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षातील, खास करून शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) ७ ते ८ खासदार मनाने आपल्यासोबत आहेत. कायदेशीर अडचणी असल्यामुळे पक्षप्रवेश होऊ शकत नाही.

यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वच विरोधी पक्षांतील खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आणखी वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या संपर्कात सर्वच पक्षांतील खासदार असून, ठाकरे गटातील सर्वाधिक खासदार संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे ब्रँड तेव्हाच संपला

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे ब्रँड’चा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “ठाकरे ब्रँड केव्हाच संपलेला आहे. बाळासाहेब होते तेव्हा विषय वेगळा होता. २०१९ ला तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला.”

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामार आणि त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या व्हिडिओबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “पोलिसांवर कोणी अरेरावी करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

53 मिनिटे ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

7 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

7 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

7 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

7 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago