महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात काढणार धनुष्यबाण यात्रा

छत्रपती संभाजीनगरमधून होणार यात्रेची सुरुवात

औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे.

कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे. आठ किंवा 9 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर ‘राजकारणाचा केंद्रबिंदू’ बनतोय…

राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे नेहमीच महत्वाचे स्थान राहिले आहे. राज्यातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडींचा अनेकदा उगमस्थान छत्रपती संभाजीनगर ठरतो. त्यातच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत सर्वाधिक पाच आमदार छत्रपती संभाजीनगरमधूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले होते. तर मंत्रिमंडळात देखील सर्वाधिक तीन मंत्रिपद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाले आहेत.

त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून राज्यभरात एकत्रित होणाऱ्या सभांची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगरमधूनच होत आहे. तर याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेची सुरवात देखील याच शहरातून होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

9 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

9 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

10 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

10 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

10 तास ago