महाराष्ट्र

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना त्यांनी दोन विचारधारांतील फरक स्पष्ट केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या स्वप्नातील भारत वेगळा असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर संस्थांवर ताबा मिळवण्याचा आरोप केला.

“सर्व यंत्रणांवर कब्जा”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला सत्ता व संपत्ती हवी असून निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका आणि इतर सरकारी यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. देशात हिंसा, द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

“संविधानानुसार देश चालला पाहिजे”

काँग्रेसची विचारधारा सत्तेचे विकेंद्रीकरण, सर्वसमावेशकता आणि संविधाननिष्ठ शासनाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून ते शाहू, फुले, आंबेडकर, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारित भारत घडवण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

नेहरूंचा दाखला

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात जवाहरलाल नेहरू यांनी सहा बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिल्याचा दाखला देत सर्व विचारधारांना सामावून घेण्याची परंपरा काँग्रेसची असल्याचे त्यांनी नमूद केले. एका सामान्य महिलेने नेहरूंची कॉलर पकडून प्रश्न विचारल्याची आठवण सांगत, आजच्या भारतात सरकारविरोधात बोलण्याची भीतीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

“डरो मत”चा संदेश

आपले नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या “डरो मत” संदेशाचा उल्लेख करत, कोणत्याही दबावाला न घाबरता विचारांची लढाई लढा, असे आवाहन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेस संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी पक्ष संपणार नाही, असा दावा त्यांनी केला.या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, आरजे संग्राम खोपडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

1 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

1 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

2 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

2 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

2 तास ago

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…

2 तास ago