मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना त्यांनी दोन विचारधारांतील फरक स्पष्ट केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या स्वप्नातील भारत वेगळा असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर संस्थांवर ताबा मिळवण्याचा आरोप केला.
“सर्व यंत्रणांवर कब्जा”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला सत्ता व संपत्ती हवी असून निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका आणि इतर सरकारी यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. देशात हिंसा, द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
“संविधानानुसार देश चालला पाहिजे”
काँग्रेसची विचारधारा सत्तेचे विकेंद्रीकरण, सर्वसमावेशकता आणि संविधाननिष्ठ शासनाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून ते शाहू, फुले, आंबेडकर, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारित भारत घडवण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
नेहरूंचा दाखला
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात जवाहरलाल नेहरू यांनी सहा बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिल्याचा दाखला देत सर्व विचारधारांना सामावून घेण्याची परंपरा काँग्रेसची असल्याचे त्यांनी नमूद केले. एका सामान्य महिलेने नेहरूंची कॉलर पकडून प्रश्न विचारल्याची आठवण सांगत, आजच्या भारतात सरकारविरोधात बोलण्याची भीतीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
“डरो मत”चा संदेश
आपले नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या “डरो मत” संदेशाचा उल्लेख करत, कोणत्याही दबावाला न घाबरता विचारांची लढाई लढा, असे आवाहन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेस संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी पक्ष संपणार नाही, असा दावा त्यांनी केला.या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, आरजे संग्राम खोपडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…