महाराष्ट्र

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना त्यांनी दोन विचारधारांतील फरक स्पष्ट केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या स्वप्नातील भारत वेगळा असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर संस्थांवर ताबा मिळवण्याचा आरोप केला.

“सर्व यंत्रणांवर कब्जा”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला सत्ता व संपत्ती हवी असून निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका आणि इतर सरकारी यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. देशात हिंसा, द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

“संविधानानुसार देश चालला पाहिजे”

काँग्रेसची विचारधारा सत्तेचे विकेंद्रीकरण, सर्वसमावेशकता आणि संविधाननिष्ठ शासनाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून ते शाहू, फुले, आंबेडकर, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारित भारत घडवण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

नेहरूंचा दाखला

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात जवाहरलाल नेहरू यांनी सहा बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिल्याचा दाखला देत सर्व विचारधारांना सामावून घेण्याची परंपरा काँग्रेसची असल्याचे त्यांनी नमूद केले. एका सामान्य महिलेने नेहरूंची कॉलर पकडून प्रश्न विचारल्याची आठवण सांगत, आजच्या भारतात सरकारविरोधात बोलण्याची भीतीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

“डरो मत”चा संदेश

आपले नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या “डरो मत” संदेशाचा उल्लेख करत, कोणत्याही दबावाला न घाबरता विचारांची लढाई लढा, असे आवाहन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेस संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी पक्ष संपणार नाही, असा दावा त्यांनी केला.या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, आरजे संग्राम खोपडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

2 तास ago

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

3 तास ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

3 तास ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

8 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

8 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

8 तास ago