महाराष्ट्र

संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी ‘मूळ पादुका’ मागणीवर विधानपरिषदेत चर्चा

मुंबई: संत परंपरेने समृद्ध महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा सुमारे ७३० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या ‘मूळ पादुका’ नेण्याच्या मागणीवर विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सविस्तर चर्चा झाली.सभागृहात विविध सदस्यांनी आपापली मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

योगेश टिळेकर यांची लक्षवेधी

लक्षवेधी क्र. २ द्वारे सदस्य योगेश टिळेकर यांनी अरण येथे होणाऱ्या संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर मार्फत पांडुरंगाच्या मूळ पादुका आणण्याची मागणी मांडली.वारकरी संप्रदायाच्या भावना आणि संत परंपरेतील अध्यात्मिक संदर्भ लक्षात घेऊन समितीने आवश्यक तरतुदींमध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित न्यासच्या कामकाजाबाबत तक्रारींची चौकशी करून आवश्यक असल्यास प्रशासक नेमावा, अशी मागणीही करण्यात आली.

‘अरणला मूळ पादुका नेण्याची परंपरा नाही’ – आशिष जयस्वाल

उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले की अरण येथे मूळ पादुका नेण्याची परंपरा अस्तित्वात नाही. सुमारे दीडशे वर्षांपासून स्थानिक परंपरेनुसार इतर पादुकांची पालखी जाते.२०१४ पासून पंढरपूर ते आळंदी दरम्यान मूळ पादुका नेण्याची प्रथा सुरू झाली आहे; मात्र अरण संदर्भात अंतिम निर्णय संबंधित न्यासाच्या बैठकीत घेतला जाईल. तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अमोल मिटकरी यांची भूमिका

चर्चेत सहभागी होताना सदस्य अमोल मिटकरी यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. तसेच मंदिर समिती व न्यासाच्या मुदतवाढ आणि कार्यपद्धतीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

सर्वसंमतीचा मार्ग स्वीकारण्याचे निर्देश

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संत परंपरा, वारकरी समाजाच्या भावना आणि कायदेशीर बाबी यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे नमूद केले. न्यासातील अनेक सदस्यांची कालमर्यादा संपल्याने सध्याच्या स्थितीत निर्णय प्रक्रियेत अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्यासाची सद्यस्थिती आणि संभाव्य मतभेद लक्षात घेता सर्व संबंधित घटक, परंपरा अभ्यासक, वारकरी प्रतिनिधी आणि कायदेविषयक तज्ज्ञ यांची बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. समाधी सोहळ्यापूर्वी निर्णय व्हावा, असेही सभागृहातून सुचविण्यात आले. या चर्चेमुळे संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अरण येथील धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायाच्या भावना आणि मंदिर समितीच्या अधिकारक्षेत्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

2 तास ago

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

3 तास ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

3 तास ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

8 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

8 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

8 तास ago