महाराष्ट्र

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप झाला. २४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या शिबिरात राज्यातील जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

राहुल गांधी यांचे बुधवारी सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शोभा बच्छाव, जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर राहुल गांधी यांनी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिश्ती आणि वामशी रेड्डी उपस्थित होते.

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यानंतर प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्याचा आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचा संदेश दिला.

विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती देत त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथून आलेल्या आंदोलनकारी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत काँग्रेस पक्ष त्यांच्या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

15 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

15 तास ago