महाराष्ट्र

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिंदे म्हणाले, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे.”

पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “देशाला प्रगतीपथावर नेणारे, भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा ध्यास घेतलेले मोदी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. ‘देश प्रथम’ हीच त्यांची भूमिका आहे. अशा नेतृत्वावर अश्लाघ्य आरोप करणे ही काँग्रेसची खालची पातळी दाखवते,” असे ते म्हणाले.

काँग्रेसवर निशाणा साधताना शिंदे पुढे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या काळातही काँग्रेसने पाकिस्तानची भाषा बोलत भारतीय जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पंतप्रधानांनी ठोस कारवाई करून देशाच्या सन्मानासाठी उभे राहत शत्रूंना प्रत्युत्तर दिले, पण काँग्रेसला तेही पचले नाही.”

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा न देता ते अडवण्याचा प्रयत्न केला, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. “१४० कोटी जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरत काँग्रेसने महिलांच्या हक्कांनाच विरोध केला आहे. त्यामुळे देशातील महिला वर्गात काँग्रेसविरोधात तीव्र संताप निर्माण झाला असून, आगामी काळात महिलाच काँग्रेसला धडा शिकवतील,” असा घणाघात त्यांनी केला.

“महिलांच्या सन्मानासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक भूमिका घेणाऱ्या नेतृत्वावर टीका करणे म्हणजे देशद्रोहाच्या जवळ जाणारे वक्तव्य आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने देशविरोधी सूर लावतात. त्यामुळे तेच खरे राष्ट्रद्रोही असल्याचे जनतेसमोर उघड होत आहे,” असा घणाघातही शिंदे यांनी केला.काँग्रेसच्या राजकीय भविष्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“अशा संतापजनक वक्तव्यांमुळे काँग्रेस स्वतःचीच कबर खोदत आहे. १४० कोटी जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी काळात विशेषतः महिला वर्ग काँग्रेसला धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला.“परदेशात जाऊन देशाची बदनामी करणे, पाकिस्तानची भाषा बोलणे आणि राष्ट्रीय हिताला धक्का पोहोचवणे हे काँग्रेसचे खरे चेहरे आहे,” असा आरोप करत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

7 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

7 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

8 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

8 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

10 तास ago