महाराष्ट्र

भारत–अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचा एल्गार; ७ मार्चला यवतमाळात आंदोलन; विजय वडेट्टीवार

नागपूर: भारत–अमेरिका नव्या व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या कराराविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून ७ मार्च रोजी यवतमाळ येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत भारत–अमेरिका व्यापार करार आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर शून्य टक्के कर आणि भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर १० टक्के कर आकारला जाणार असल्यास हे धोरण अन्यायकारक ठरेल, असा दावा त्यांनी केला. या असमतोलामुळे महाराष्ट्रातील कापूस, मका, तूरडाळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत येतील, असे ते म्हणाले.

सध्या कापसाला सुमारे ४,५०० रुपये दर मिळत असून मक्याचा भाव केवळ १,५०० रुपयांवर आला आहे. सोयाबीनचे दरही घसरले आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यात अधिक रस दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारे हे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीतील बैठक ही केवळ व्यापार करार आणि आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट करत चंद्रपूर प्रकरणात आपण कोणतीही चूक केलेली नसताना माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. काही हितशत्रू जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील मराठी शाळा बंद करून शहराचे ‘गुजरातीकरण’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यात २२ हजार शाळा बंद पडल्या असून सुमारे ४ हजार शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. हे सरकार जाणीवपूर्वक शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे सांगत सिन्नर आणि बदलापूर येथील घटनांचा उल्लेख त्यांनी केला. मुली बेपत्ता होणे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारने तातडीने विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर होते. राहुल गांधी कोणत्याही दबावाला घाबरणारे नाहीत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राहुल गांधींची भीती वाटते, असा दावा करत कितीही खटले दाखल झाले तरी काँग्रेस सत्यासाठी लढत राहील, असे वडेट्टीवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

5 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

10 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

10 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

10 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

10 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

12 तास ago