पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई येथील युवा उद्योजक व समाजसेवक अमोल रामदास पुंडे यांनी विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुलभ होणार असून परिसरात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बापूसाहेब ननवरे होते. यावेळी माजी सरपंच शिवराम पुंडे, माजी चेअरमन भाऊसाहेब तळोले, सरपंच कोंडीभाऊ पुंडे, बंडू पुंडे, मोहन पुंडे, दीपक तळोले, पोलीस अधिकारी विठ्ठलराव खर्डे, समाजसेवक शहाजी दळवी, लहू तळोले, रमेश खर्डे, पोपटराव तळोले, आबा शिंदे, निखिल पुंडे, अजित पुंडे, संग्राम ननवरे, राजेंद्र गावडे, अतुल गावडे, प्रतीक दाते, ओम आदक, निलेश ननवरे, अक्षय ननवरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक मनोज धुमाळ, रामदास कुलट, संतोष पुंडे, आकाश भोकनळ, अविनाश भोकनळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
सायकल प्राप्त झालेल्या विद्यार्थिनी साईशा गायकवाड हिने, “ही सायकल माझ्या शिक्षणाच्या वाटचालीला नवे बळ देणारी ठरेल,” अशी भावना व्यक्त करत अमोल पुंडे यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने अमोल रामदास पुंडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य विनोद शिंदे यांनी आभार मानले, तर प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…