संगीतमय रस्त्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले उद्घाटन
मुंबई: भारतातील हा पहिलाच संगीतमय रस्ता असून अत्यंत अभिनव अशा या संकल्पनेमुळे मुंबईकरांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल. सध्या सुमारे ५०० मीटर अंतरावर तयार करण्यात आलेला हा प्रकल्प पुढे वाढवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोस्टल रोड अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्गावर देशातील पहिल्या ‘मेलडी रोड’चा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्यक्ष प्रवास करून संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला. वाहन चालवत असताना ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू आली, हा वेगळाच आणि आनंददायी अनुभव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी हंगेरीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून उपस्थित हंगेरीचे काउन्सिल जनरल यांचे त्यांनी अभिनंदन केले. या उपक्रमाची संकल्पना मांडल्याबद्दल खासदार राहुल शेवाळे यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
मुंबईत आणि कदाचित देशात पहिल्यांदाच असा मेलोडी रोड साकारला गेला असून या उपक्रमामुळे शहराच्या नावात आणखी एक नाविन्यपूर्ण भर पडली आहे. भविष्यातही अशा अभिनव सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्व संबंधितांचे अभिनंदन करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…