महाराष्ट्र

थोरल्या जाउबाईंच्या निधनाच्या धक्‍याने धाकट्या जावेने सोडला प्राण…

पारगाव (दौंड): पारगावमध्ये थोरल्या जाउबाईंच्या निधनाच्या मानसिक धक्‍याने धाकट्या जावेने प्राण सोडल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पारगाव येथील कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांच्या भाऊजई लता ताकवणे (वय 58) यांचे बुधवारी (ता. 10) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. गेली 30 वर्षांपासून एकत्र कुटुंबातील धाकट्या जाऊचे निधन झाल्याने पोपटराव ताकवणे यांच्या पत्नी रजनी ताकवणे (वय 62) यांना मानसिक धक्‍का बसला. त्यांना त्यातून सावरण्याचा कुटुंबाने अतोनात प्रयत्न केला; परंतु सहा दिवसा नंतर मंगळवारी (ता.16) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचेही निधन झाले.

रजनी ताकवणे या दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या माजी संचालिका होत्या. त्या उच्चशिक्षित होत्या. समाजात विरहाने निधनाच्या अनेक घटना घडतात; परंतु जावेच्या विरहाने निधन घडण्याची घटना कदाचित पहिलीच असू शकते. संख्या बहिणीं पेक्षा जास्त प्रेम या दोघींचे होते. या दोघी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

13 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

16 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

16 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

16 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

18 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

18 तास ago