रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीसाठी तत्काळ आपला शासकीय ताफा थांबवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
रायगड किल्ल्यावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे महाडकडे रवाना झाले होते. महाड-पाचाड मार्गावरील निर्जन रस्त्यावर एका दुचाकीचा रस्त्याच्या कडेला साचलेल्या मातीमुळे घसरून अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ताफा थांबवून अधिकाऱ्यांना जखमींची विचारपूस करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर शिंदे स्वतः वाहनातून उतरून जखमी बाईकस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणाची आस्थेने चौकशी केली. दोघांना पाणी देण्यात आले तसेच ते कोणत्या गावचे आहेत, याची माहिती घेतली. दोघांनीही हेल्मेट परिधान केले असल्याने गंभीर दुखापत टळली होती. मात्र, मागे बसलेल्या तरुणाच्या पायाला दुखापत झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी ताफ्यातील रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावली.
दोन्ही जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देत, त्यांच्या उपचारांची माहिती स्वतःला फोनवर कळविण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. जखमींची योग्य व्यवस्था झाल्याची खात्री करूनच ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.सामान्य नागरिकांच्या अडचणीच्या वेळी तत्काळ मदतीला धावून जाण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आली.
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…