मुंबई: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी आघाडीने निवडणूक आयोग आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवर खापर फोडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरु राहिली.त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची कबुली शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
आघाडीवर प्रश्नचिन्ह
सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात काही अर्थ नसल्याचे स्पष्ट मत करताना ”लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते. विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती,” हे ठाकरे यांनी मान्य केले. जागा वाटपाबाबत ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ नसल्याचे सांगत महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘लोकसभेचे यश डोक्यात गेले होते’
महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते. लोकसभेच्यावेळी आपल्याला जिंकायचे आहे, हे आपलेपण होते. विधानसभेला मला जिंकायचे हा आपल्यात जो ‘मी’पणा आला त्यामुळे पराभव झाल्याचेही ठाकरे यांनी मान्य केले.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…