लातूर: लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण करत आहेत? राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
विजय वडेट्टीवार कृषिमंत्री अधिवेशनात पत्ते खेळतात
कृषिमंत्री शेतकऱ्यांचा अपमान करतात, अधिवेशनात पत्ते खेळतात, याचा जाब विचारल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारहाण करतात, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याची मुभा मिळाली आहे का? महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचा सदस्य आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाला इतका राग का यावा? मंत्री बेजबाबदार वागत असतील तर प्रश्न विचारायचे नाही का? अशी सोशल मिडिया पोस्ट वडेट्टीवार यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर केली आहे.
विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेला मारहाण
लातूरमध्ये रविवारी जे घडलं, त्याने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध करत लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राजीनाम्याची मागणी केली. मात्र या मागणीचं उत्तर मारहाणीच्या रूपात मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचे सदस्य सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.
विजय वडेट्टीवार कायद्याची उघडपणे पायमल्ली
या घटनेनंतर संपूर्ण लातूर बंद ठेवण्यात आला. सर्वपक्षीय नेते, संघटना, युवक आक्रमक झाले. छावा संघटनेच्या पाठिंब्याने हा बंद पार पडला. सुरज चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्याची घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, आणि विरोधी पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सत्तेची मस्ती शेतकऱ्यांची पोरं फोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत छावा संघटनेने इशारा दिला आहे. मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे. सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यभर होत आहे.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…