महाराष्ट्र

राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा; विजय वडेट्टीवार

लातूर: लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण करत आहेत? राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का? असा सवाल देखील त्यांनी केलाय.

विजय वडेट्टीवार कृषिमंत्री अधिवेशनात पत्ते खेळतात

कृषिमंत्री शेतकऱ्यांचा अपमान करतात, अधिवेशनात पत्ते खेळतात, याचा जाब विचारल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारहाण करतात, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याची मुभा मिळाली आहे का? महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचा सदस्य आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाला इतका राग का यावा? मंत्री बेजबाबदार वागत असतील तर प्रश्न विचारायचे नाही का? अशी सोशल मिडिया पोस्ट वडेट्टीवार यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर केली आहे.

विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेला मारहाण

लातूरमध्ये रविवारी जे घडलं, त्याने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध करत लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राजीनाम्याची मागणी केली. मात्र या मागणीचं उत्तर मारहाणीच्या रूपात मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचे सदस्य सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.

विजय वडेट्टीवार कायद्याची उघडपणे पायमल्ली

या घटनेनंतर संपूर्ण लातूर बंद ठेवण्यात आला. सर्वपक्षीय नेते, संघटना, युवक आक्रमक झाले. छावा संघटनेच्या पाठिंब्याने हा बंद पार पडला. सुरज चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्याची घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, आणि विरोधी पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सत्तेची मस्ती शेतकऱ्यांची पोरं फोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत छावा संघटनेने इशारा दिला आहे. मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे. सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यभर होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

13 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

13 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

17 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

17 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

17 तास ago