महाराष्ट्र

मुंबईत भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी; महापौर रितू तावडे यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून यावर्षीच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची विनंती केली आहे.

मुंबईत दररोज लाखो पर्यटक आणि व्यावसायिक ये-जा करत असतात. शहरात प्रवेश करतानाच मुंबईची वेगळी आणि आकर्षक ओळख निर्माण व्हावी, तसेच जागतिक स्तरावर शहराची प्रतिमा अधिक भक्कम व्हावी, या उद्देशाने चारही प्रमुख प्रवेशबिंदूंवर भव्य प्रवेशद्वार, सौंदर्यीकरण आणि क्लॉक टॉवर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

महापौरांनी सुचविलेल्या ठिकाणांमध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड चेक नाका, मुलुंड-ऐरोली मार्ग, वाशी-मानखुर्द मार्ग तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर चेक नाका या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व प्रवेशमार्गांवर आकर्षक रचना, प्रकाशयोजना आणि सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

“मुंबईत प्रवेश करतानाच शहराची भव्यता आणि सांस्कृतिक ओळख प्रकर्षाने जाणवली पाहिजे. प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर ही केवळ वास्तू नसून मुंबईच्या अस्मितेचे प्रतीक ठरतील,” असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.या प्रस्तावावर प्रशासन काय निर्णय घेते आणि आगामी अर्थसंकल्पात यासाठी किती निधी राखीव ठेवला जातो, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

8 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

8 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

8 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

8 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

10 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

10 तास ago